सावत्र मुलावरच जडला जीव, पण या मुघल राणीच्या नशीबी आला भयानक मृत्यू

भारतात मुघलांनी कित्येक वर्षे राज्य केले. त्यांच्या शासनकाळातील अनेक घटना आजही गोष्टी स्वरुपात सांगितल्या जातात.

मुघल शासनकाळातील एक प्रेमकहाणी खूप जास्त चर्चेत आहे. या प्रेमकहाणीबद्दल आजही मत-मतांतरे आहेत.

मुघल साम्राज्यात अशी एक राणी होती जिचा तिच्याच सावत्र मुलावर जीव जडला. मात्र त्याबदल्यात तिला भयानक मृत्यूला सामोरे जावे लागले

मुघल बादशाह अकबर यांच्या अनेक राण्या होत्या. त्यातीलच एक म्हणजे अनारकली. असं म्हणतात की अनारकली ही बादशाहची दासी होती आणि त्यांना एक मुलगा देखील होता. त्याचे नाव दानियाल होते .

अकबरचा उत्तराधिकारी जहांगीर याचे अनारकलीवर जीवापाड प्रेम होते. अनारकली जहांगीरची सावत्र आई होती. मात्र, तरीही त्यांने नात्याचे बंधन झुगारुन प्रेम केले.

अकबरला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो रागाने वेडापिसा झाला आणि याची शिक्षा म्हणून अनारकलीला भिंतीत चिणून मारले

त्यानंतर जहांगीरने पाकिस्तानातील लाहौरमध्ये अनारकलीसाठी मकबरा बांधला. त्यावर आजही अनारकलीच्या मृत्यूचे साल 1599 हे लिहले आहे.

VIEW ALL

Read Next Story